निवळी नदीवर वनराई बंधारा

0

मंडणगड : मार्च, एप्रिल व मे महिन्यात विहिरींचे पाणी साठे कमी होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, याकरिता मंडणगड नगरपंचायतीने निवळी नदीवर वनराई बंधारा बांधला आहे. त्यामुळे पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.

जानेवारी महिन्यापासून टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी नगर पंचायतीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. उद्भव विहिरीच्या स्रोतांचे बळकटीकरण तसेच सर्व संभाव्य जलस्रोतांचा वापर करून पाणी कपात करावी लागू नये, यासाठी नगरपंचायत प्रशासनाने कंबर कसली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून मुख्याधिकारी विनोद डवले यांच्या मार्गदर्शनाखाली निवळी नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता कमिटी सभापती सुभाष सापटे, प्रशासकीय अधिकारी अभिजित राणे, पाणी विभाग प्रमुख विकास साळवी, कर्मचारी गणेश सापटे, प्रमोद मर्चंडे, प्रकाश करावडे, मोहन तलार, संतोष शिगवण, रूपेश तांबे, अभिजित साळवी, महेंद्र मर्चडे, शरद धोत्रे यांनी श्रमदान करून सहकार्य केले. या उपक्रमाबद्दल परिसरातून धन्यवाद देण्यात येत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:41 16-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here