रत्नागिरी : जिल्ह्यातील असंघटीत कामगारांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची माहिती एकत्रित करण्याच्यादृष्टीने शासनाच्या कामगार विभागाकडून ई – श्रम पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
यावर नोंदणी करणाऱ्या कामगारांना २ लाख रुपयांचा अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. विविध क्षेत्रात कामगारांची संख्या अधिक आहे. मात्र, हे कामगार असंघटित असल्याने त्यांच्या वेतनापासून अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा कामगारांची एकत्रित माहिती जिल्हास्तरावर संघटित केली जात आहे. जिल्हा कामगार कार्यालयाकडून ई-श्रम पोर्टलच्या माध्यमातून असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे.
ई- श्रम कार्डसाठी नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागते. त्यांनतरच ई- श्रम कार्ड मिळणार आहे. अपघाती विमा काढल्यानंतर असंघटित क्षेत्रातील कामगाराचा अपघातात मृत्यू झाल्यास वारसाला २ लाख रुपये दिले जातात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:05 25-03-2023