रत्नागिरी : महिला उद्योजकांची संख्या वाढावी, त्यासाठी राज्यात आश्वासक वातावरण निर्माण करणे व तांत्रिक, परिचालनात्मक तसेच आर्थिक साहाय्य पुरवून राज्यातील महिलांना अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील महिला उद्योजकांसाठी विशेष धोरणाला शासनाने २०१७ मध्ये मान्यता दिली आहे.
या धोरणानुसार जिल्ह्यातील अनेक महिलांना सबलीकरणाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. मात्र, या योजनेविषयी अजूनही महिलांमध्ये जागृती झाली नसल्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या महिला उद्योजकांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येण्याइतपत आहे.
या विशेष धोरणाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील महिला अतिशय अल्प उद्योजकांकडून प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. या उद्योजकांमध्ये या योजनेबाबत अजूनही माहिती झालेली नाही. त्यामुळे योजना केवळ कागदावरच राहिली आहे.
महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांनी उद्योजकतेत यावे, स्वावलंबी व्हावे, या उद्देशाने शासनाने २०१७ साली महिलांच्या सशक्तीकरणासाठी विशेष धोरण हाती घेतले आहे. या धोरणाचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा आणि सबलीकरणाला वाव द्यावा, यासाठी जिल्हा उद्योग केंद्र प्रयत्नशील आहे. इच्छुक महिलांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे संपर्क करावा.
इच्छुक महिला उद्योजकांनी अर्ज करण्यासाठी रत्नागिरीतील जिल्हा उद्योग केंद्राकडे संपर्क करावा. www.mahawe.in या संकेतस्थळावरही अर्ज करता येतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 31-03-2023