”पाकिस्तानला शांतता प्रस्थापित करायची आहे; भारताने कारवाई केली तर चोख प्रत्युत्तर देऊ”

इस्लामाबाद : पाकिस्तानकडून वारंवार भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडघशी पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा पाकने भारताला पोकळ धमकी दिली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारताने जर आमच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न केला, तर पाकिस्तानकडून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशा आशयाची धमकी दिली. पाकिस्तानला शांतता प्रस्थापित करायची आहे. आमचा संयम म्हणजे आमचा कमकुवतपणा समजण्याची चूक करू नका, असे कुरेशी म्हणाले. पाकिस्ताविरोधात भारताने काहीही करण्याची हिंमत केली तर त्याचे जशास तसे उत्तर दिले जाईल. आम्ही काश्मिरमधील कथितरित्या होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनांबाबत दखल घेण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस आणि इस्लामिक सहकार संघटनेकडे संपर्क साधल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. तत्पूर्वी पाकिस्तानवर इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनमध्ये (ओआयसी) तोंडघशी पडण्याची नाचक्की ओढावली आहे. इस्लामोफोबियाच्या आरोपावरून पाकिस्तानने भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. पण भारताची या संघटनेच्या सदस्य देशांपैकी अनेकांनी बाजू घेतल्याचे पाहायला मिळाले. मालदीव व्यतिरिक्त सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीनं भारताची बाजू घेतल्याचे समोर आले आहे. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अकरम यांनी आयओसीच्या एका ऑनलाइन बैठकीदरम्यान भारत इस्लामोफोबियाला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला होता. परंतु याचे खंडन करत मालदीवने भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे, असे म्हटले. तसेच २० कोटीहून अधिक मुस्लिम भारतात वास्तव्य करत असून अशाप्रकारचा भारतावर आरोप करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here