रत्नागिरी : रविवारी अवकाळी पावसाने पहाटे रत्नागिरीत हजेरी लावल्याने उरलासुरला आंबा संकटात सापडला आहे. अवकाळी पावसानंतर तापमानातही वाढ झाल्याने मोहोर गळून आणि करपून गेला आहे. आंब्यावरील या संकटामुळे बागायतदार धास्तावले आहेत.
शनिवारी देवरूख, चिपळूण आणि राजापूरातील काही परिसरात पाऊस पडला होता. रविवारी सकाळी सहा वाजता रत्नागिरी शहर परिसरात पावसाने हजेरी लावली. 15 ते 20 मिनिटे पडलेल्या पावसामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाले आहेत. यंदा आंब्याचे उत्पादन कमी असताना उरल्यासुरल्या आंब्याला लहरी हवामानाचा फटका बसला आहे. फेब्रुवारी महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे मोहोर गळून आणि करपून गेला. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात येणारा आंबा नष्ट झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 10-04-2023