यंदा भात बियाण्याची मागणी वाढली

0

रत्नागिरी : आगामी खरीप हंगामासाठी महाबीज साडेसहा हजार क्विंटल व खासगी अडीच हजार क्विंटल असे एकूण नऊ हजार क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. तर १५, २२० टन खत आवंटन मंजूर आले आहे.

गतवर्षीपेक्षा यावर्षी एक हजार क्विटल भात बियाण्याची अधिक मागणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुन्हाडे यांनी दिली.

गतवर्षी २०२२ खरीप हंगामासाठी महाबीज व खासगी कंपनीचे असे एकूण आठ हजार क्विंटल भातबियाणे मागविण्यात आले होते. यावर्षी कोठेही शेतकऱ्यांना बियाणे कमी पडू नये, यासाठी दोन हजार क्विंटल अधिक भात बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरावर शेतकऱ्यांना बियाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:19 22-04-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here