रत्नागिरी : रत्नागिरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी बोट रोखले आहे.
या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून आधी कामे केली जातात. नंतर वर्कऑर्डर दिली जाते, असा खळबळजनक आरोप कीर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
बांधकाम, नगर परिषदेची कामे ठेक्याआधीच पूर्णत्वास जात असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात पाच ठिकाणी सुरू असलेल्या कामाबाबत सय्यद नामक अभियंत्याला घेऊन संबंधित बांधकामाची पाहणी केली. पण पंचनाम्याची प्रत मागितल्यावर अधीक्षक अभियंता व संबंधित अभियंता सय्यद कार्यालयातून निघून गेले. तसेच पंचनाम्याची प्रत देण्यास टाळाटाळ केली, असा आरोपही कीर यांनी केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 01-05-2023