रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात ४० मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी आरामबसला अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री साडे दहा वाजता घडली. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या ४० मजुरांना पोलीस परवानगी घेऊन ही खासगी आरामबस रत्नागिरी येथून नेपाळला घेऊन जात असता भोस्ते घाटात एका अवघड वळणावर संरक्षण कठडा तोडून पलटी झाली. संरक्षण कठडा मजबूत असल्याने एका कठड्याला बस अडकून बस खोल दरीत जाण्यापासून वाचली. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:13 PM 01-Jun-20