कोकण किनारपट्टीवर ११ मे पर्यंत वादळी पावसाचा इशारा

0

रत्नागिरी : रविवारी रात्री कोकण किनारपट्टी भागात पावसाने हजेरी लावली असताना बंगालच्या उपसागरात विकसित होऊ घातलेल्या ‘मोका’ चक्रीवादळामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वादळामुळे पूर्व किनारपट्टीवरील भागांना ११ मेपर्यंत सतर्कतेचा इशाराही देण्यात आला असताना या बाबत कोकण किनारपट्टी
भागातही सावधगिरी बाळगण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

दरम्यान, ‘मोका’चा प्रभाव कोकण किनारी भागात जाणवणार नसला तरी आगामी दोन दिवस मळभी वातावरण राहणार आहे. तसेच हलक्या पावसाचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांत रविवारी पावसाने हजेरी लावली. तसेच रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागतही पावसाचा हलका शिडकावा झाला. त्यामुळे कोकणातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यात विविध भगात मळभी वातावरणाचा खेळ सुरू होता. ढगाळ वातावरणामुळे तापमानात उतार झाल्याने उकाडा कमी जाणवत होता. ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात काहिशी घट झाली आहे. मात्र, आद्रतेमुळे उकाडा कायम आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 09-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here