आगीमुळे आंबा-काजू बागांचे नुकसान; दोघांवर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : तालुक्यातील दाभिळ आंबेरे येथे गाळ्यांना लावलेली आग पसरुन बाजुच्या बागेतील आंबा काजूची झाडे जळून हजारोंचे नुकसान झाले. ही घटना २६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८ वा. सुमारास घडली होती. या प्रकरणी दोन संशयितांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन विठ्ठल कदम रस्तीना नितीन कदम (दोन्ही रा. शिवार आंबेरे जाकादेवी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात फिर्यादींनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानूसार, २६ एप्रिल रोजी सकाळी संशयितांनी आपल्या स्वतः च्या बागेतील गाळ्यांना आग लावली होती. ती आग ती शेजारील बागांमध्ये पसरुन तेथील आंबा-काजूची झाडे जळून खाक होउन नुकसान झाले होते. या प्रकरणी फिर्यादींनी शुक्रवार ५ मे रोजी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या बाबत अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:22 09-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here