बारसूतील शेतकऱ्यांना रिफायनरी कंपनीने भागीदार करून घ्यावे : सदाभाऊ खोत

0

राजापूर : राजापूर तालुक्यात बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत, त्या शेतकऱ्यांना रिफायनरी कंपनीने कंपनीचे भागीदार करून घ्यावे, अशी मागणी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रमुख व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

एकीकडे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेले, अशी ओरड करायची आणि दुसरीकडे रिफायनरी प्रकल्प बारसूत राबवावा, असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र द्यायचे आणि आता मुख्यमंत्री पद गेल्यावर आपणच सूचवलेल्या सूचवलेल्या जागेवर रिफायनरी प्रकल्प उभारण्यास विरोध करायचा, ही उध्दव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी व संशयास्पद दुटप्पी व संशयास्पद असल्याची भूमिका खोत यांनी मांडली आहे.

कोकणात रिफायनरी प्रकल्प उभारत असताना तेथील शेतकऱ्याला त्या रिफायनरी मध्ये सामावून घेतले पाहिजे. शेतकरी हा त्या कंपनीचा भागधारक झाला पाहिजे. म्हणून शेतकरी हा त्या कंपनीचा मालक शेतकरी हा त्या कंपनीचा मालक होईल. आज शेती व्यवसाय हा होईल. आज शेती व्यवसाय हा बिनभरोशाचा व्यवसाय झाला आहे. आज जर शेती व्यवसाय भरोशाचा असता आणि त्यातून भरघोस उत्पन्न मिळाले असते तर राजकारण्यांनी आपल्या नावावर सात-बारा करून शेतकरी झाले असते. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना चांगले पैसे कसे मिळतील त्यातून त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण कसे होईल, त्यांना रोजगार कसा मिळेल, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

अशा प्रकारे भविष्यात शेतकऱ्याला रिफायनरीमध्ये भागधारकच करून घेतल्यास अनेक शेतकरी आमच्या जमिनी घ्या म्हणून पुढे येतील आणि त्यांचा विरोध राहणार नाही. कोकणातील शेतकरी हा गुंठ्यावरचा शेतकरी आहे. त्यामुळे तो शेतकरी कंपनीचा भागधारक झाला तर त्यांचा निश्चित आर्थिक विकास होईल, असेही खोत म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 10-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here