रत्नागिरी : खेडचे तत्कालीन नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याविरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यास चालढकल केली जात आहे, असा आरोप माजी मंत्री रामदास कदम यांनी केला आहे.
वैभव खेडेकर यांच्याविरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याबाबत २४ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असल्याची माहिती श्री. कदम यांनी दिली. डिसेंबरमध्ये ९ प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांकडे देऊन ४ महिन्यांचा कालावधी लोटूनदेखील अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. खेडेकर यांच्याविरोधात. १८ डिसेंबर २०२२ रोजी ९ प्रकरणांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी दिली होती. त्यातील काही प्रकरणात चौकशी सुरू असून या नवीन प्रकरणामुळे १८ प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहेत, असे श्री. कदम म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 10-05-2023