▶️ शिंदे -फडवणीस सरकार बचावल्याने रत्नागिरी मध्ये पेढे भरवून जल्लोष
रत्नागिरी : महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सत्तासंघर्षांचा निकाल आज सुप्रीम कोर्टाने जाहीर केला. यामध्ये सदरील निकाल शिंदे फडणवीस सरकार यांच्या बाजूने लागल्याने आज रत्नागिरी मध्ये कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढा भरवून आनंद उत्सव साजरा केला.
यावेळी राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, शहर संघटक सौरभ मलुष्टे, विकास पाटील, मनोज साळवी, बावा नाचणकर, मुसा काझी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:42 11-05-2023
