रत्नागिरी : प्रस्तावित रिफायनरीच्या माती परीक्षणाचे काम सुरु असल्याने बारसूमध्ये गेले काही दिवस आंदोलने सुरू होती. या भागात नागरिकांसह पोलिस व बाहेरून आलेल्या लोकांनी टाकलेल्या प्लास्टिक बॉटलचा कचरा परिसरात पडला होता. बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिस यंत्रणेने या भागात साफसफाई मोहीम राबवत हे प्लास्टिक गोळा केले.
मागील काही दिवसांपासून बारसू पंचक्रोशी परिसरात प्रस्तावित रिफायनरीसाठी माती परीक्षण सुरु होते. यावेळी ग्रामस्थांनी आंदोलने केली. या बंदोबस्तासाठी पोलिस यंत्रणाही मोठ्या प्रमाणात कामाला लागली होती. प्रचंड उकाड्याचे दिवस असल्यामुळे पाणी बॉटलचा वापरही मोठ्या प्रमाणात झाला. पाणी प्यायल्यावर रिकाम्या झालेल्या बॉटल नागरिक, सरकारी यंत्रणेच्या लोकांनी त्याच भागात टाकून दिल्या होत्या. त्यामुळे बॉटलचा कचरा दिसून येत होता.
पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बारसू परिसरात स्वच्छता उपक्रम राबवून टाकण्यात आलेले प्लास्टिक गोळा केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 12-05-2023