रत्नागिरी : पीक विमा योजनेत आता बदल करण्यात आला असून, नव्याने सुरू केलेल्या योजनेत केवळ एक रुपयात पिकांचा विमा उतरविता येणार आहे.
नैसर्गिक आपत्ती किंवा अवेळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची पुरेशी भरपाई मिळावी, या उद्देशाने आता शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयांत पीक विमा उतरविता येणार आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामातील पिकापासून या पीकविमा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र, या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असणार कोणकोणत्या पिकांसाठी या योजनेचा लाभ मिळू शकणार, विम्याचा हप्ता कोठे व कधीपासून भरता येणार, नैसर्गिक आपत्ती किंवा अवेळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्यास, त्या नुकसानीची माहिती किती दिवसांत आणि कोणाकडे द्यावी लागणार, याबाबत अद्याप आकृतीबंध तयार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये योजनेबाबत अस्पष्टता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:49 13-05-2023
