‘वंदे भारत ट्रेन’ उद्या धावणार; कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, कोलाड स्थानकात होणार स्वागत

0

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर उद्यापासून वंदे भारत ट्रेन धावणार आहे. या वंदे भारत ट्रेनचे कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड व कोलाड या स्थानकात स्वागत करण्यात येणार आहे.

वंदे भारत गाडीला रत्नागिरी जिल्ह्यात खेड आणि रत्नागिरी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली हा थांबा असणार आहे.

उद्या 3 जून रोजी वंदे भारत रेल्वेगाडी मडगाववरून सुटणार आहे. या सुपरफास्ट गाडीची काही दिवसांपूर्वीच कोकण रेल्वेमार्गावर चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर ही गाडी कोकण रेल्वेमार्गावर धावणार हे निश्चित झाले.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील रेल्वेस्थानकांवर वंदे भारत गाडीचे स्वागत होणार आहे. त्यामध्ये 12 वाजून 15 मिनिटांनी कणकवली स्थानकात, 1 वाजून 40 मिनिटांनी रत्नागिरी स्थानकात, 1 वाजून 45 मिनिटांनी चिपळूण स्थानकात, 3 वाजता खेड स्थानकामध्ये आणि 4 वाजता कुडाळ येथे वंदे भारत गाडीचे स्वागत होणार आहे. उद्या शुभारंभाच्या फेरीसाठी चिपळूण आणि कुडाळ हे थांबे असणार आहेत. त्यानंतर या गाडीला खेड, रत्नागिरी आणि कणकवली हेच थांबे राहणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 6/2/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here