कोरोना प्रादुर्भावाचा तडाखा सहन करीत असतानाच कोकणपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. कोकणातील तीनही जिल्ह्यांमध्ये मोठी हानी झाली असून, प्रशासनाच्या सहकार्याशिवाय ती भरून येणे शक्य नाही. यासाठी रायगड-रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत निवेदन दिले. कोकणासाठी विशेष आर्थिक पॅकेज देण्याबाबत साकडे घातले.