‘सत्तेसाठी आमच्यासोबत दगाफटका झाला, नाहीतर फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले असते’

मुंबई : ‘महाराष्ट्रात आमचा पराभव झाला नाही तर केवळ दगाफटका झाल्यामुळे सत्तेपासून आम्हाला दूर राहावे लागले. अन्यथा देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते’, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले. नड्डा यांना भाजपला महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षाकडून पराभव का स्वीकारावा लागला, असा प्रश्न विचारण्यात आला असता उत्तर देताना नड्डा यांनी म्हटले की, महाराष्ट्रात आम्हीच निवडणूक जिंकलो होतो. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हाच जनमताचा कौल होता. परंतु, उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी आमचा विश्वासघात केला. सत्तेसाठी आमच्यासोबत दगाफटका झाला, असे नड्डा यांनी म्हटले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:18 AM 06-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here