आजही जिल्ह्यातील 151 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा

रत्नागिरी : चक्रीचादळामुळे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाडा तसेच पाणी प्रश्नाबाबत दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही जिल्ह्यात 76 गावातील 151 वाड्यांना 18 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. दोनच दिवसांपुर्वी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे टंचाईची तिव्रता पुढील काही दिवसात घट होईल असा अंदाज आहे. तर आजही मंडणगडमधील 6 वाड्या, दापोलीतील 20, खेड 38, चिपळूण 34, संगमश्वेर 39, लांजा 14 अशा वाड्या टंचाईग्रस्त आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here