‘निसर्ग’च्या तडाख्यात सापडलेल्या घारींना पक्षीमित्रांकडून जीवदान

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळामुळे बुधवारी वेगवान वारे वाहत असल्याने भाट्येकिनारी असलेल्या घारींनाही त्याचा फटका बसला. अनेक घारी जखमी झाल्या. पक्षीमित्रांनी तेथे धाव घेत अनेक घारींना जीवदान दिले. त्याचबरोबर भाट्ये गावातही अनेक घारी पडल्या होत्या. त्यांना स्थानिक ग्रामस्थ विकी मोरे, रोहित मुरकर, अभिषेक मुरकर, बिपीन पटेल, स्वप्नील चव्हाण आदींनी सुरक्षित ठिकाणी ठेवून जीवदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here