रत्नागिरी : पावसाने शुक्रवार सायंकाळपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. अवघ्या दोन तासाच्या कालावधीत रत्नागिरीत 237 मिलिमीटर पाऊस पडला. पावसाचे रत्नागिरी जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. काल जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात 237 मिलिमीटर नोंदला गेला. त्यानंतर राजापूर तालुक्यात 160 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मंडणगड 12 मिमी, दापोली 33 मिमी, खेड 9 मिमी, गुहागर 58 मिमी, चिपळूण 33 मिमी, संगमेश्वर 28 मिमी, लांजा 59 मिमी अशी नोंद झाली
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:19 PM 13-Jun-20