रत्नागिरी : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाची भूमिका घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर काहीसा मागे राहिलेला प्रस्तावित रिफायरनरी प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आ. जाधव यांनी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेतल्याने प्रकल्प समर्थकांना बळ मिळाले असून कोकणच्या विकासासाठी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींनी भूमिका घ्यावी, असे आवाहन प्रकल्प समर्थकांकडून केले जात आहे. सोशल मीडियामधून व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आ. जाधव यांनी कोकणात येणाऱ्या सर्वच प्रकल्पांना आपण विरोध करत राहिलो, तर कोकणातील तरुणांच्या हाताला काम देणे शक्य होणार नसल्याचा मुद्दा मांडला आहे. कोकण विकासाला चालना देणाऱ्या रिफायनरीसह अन्य प्रकल्पांचे स्वागत करीत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:39 PM 16-Jun-20