मुंबई : राज्यात गेल्या 24 तासांत 3752 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे. राज्यात काल 1672 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 60 हजार 838 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 53 हजार 901 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यात काल 100 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यासह आतापर्यंत 5751 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:42 AM 19-Jun-20