नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत तब्बल 13,586 कोरोना रुग्णांची नोंद झाली. हा आकडा आतापर्यंतचा सर्वात जास्त आहे. तर, 24 तासांत तब्बल 336 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 80 हजार 532 झाला आहे. भारतात सध्या 1 लाख 63 हजार 248 सक्रीय रुग्ण असले तरी निरोगी रुग्णांचा आकडा हा 2 लाख 04 हजार 711 झाला आहे. सक्रीय रुग्ण आणि निरोगी रुग्ण यांच्यातील फरक दिवसेंदिवस वाढत आहे की भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे. तर आतापर्यंत 12 हजार 573 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:40 AM 19-Jun-20