अंतिम वर्षाच्या परीक्षांचा घोळ संपवा : फडणवीस

मुंबई : राज्यात सध्या अंतिम वर्षांच्या परीक्षांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, या निर्णयाला राज्यपालांसह भाजपा तसेच अन्य काही संघटनांनी विरोध केला आहे. त्यातच आता शैक्षणिक संस्थाही या निर्णयाविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. दरम्यान, या वादात आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उडी घेतली आहे. फडणवीस म्हणाले, विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा घोळ हा राज्य सरकारची अनिर्णीत राहण्याची स्थिती आणि अनेक पॉवर सेंटर यामुळे निर्माण झाला. परीक्षांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, राज्यपालांना आहे असे मत राज्याच्या विधी व न्याय विभागाने दिले असल्याची माझी माहिती आहे. भविष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचे काय हे सरकारने ठरवायला हवे. अमुकच निर्णय घ्या असे आमचे म्हणणे नाही परंतू एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसह सर्वांबाबत तात्काळ निर्णय घ्या एवढाच आमचा आग्रह आहे, असे फडणवीस म्हणाले

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:30 PM 19-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here