देवरूख : देवरूख ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृह इमारतीच्या कामाला सुमारे दोन वर्षापूर्वी प्रारंभ करण्यात आला. मात्र ते काम अजूनही अर्धवट स्थितीत आहे. काम अर्धवट स्थितीत असल्याने मृतदेह नाइलाजास्तव संगमेश्वर येथे न्यावा लागतो. परिणामी मृतदेहाची हेळसांड होण्याबरोबरच नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. या इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास जाऊन ती सेवेत दाखल व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. याकडे अधिकारी वर्ग, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी जनतेमधून होत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:48 PM 19-Jun-20