देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात पहिल्यांदाच विक्रमी वाढ

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात पहिल्यांदाच विक्रमी वाढ झाली असून मागील चोवीस तास देशभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात 14,516 रुग्णांची भर पडली आहे. तर काल दिवसभरात 375 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्याचबरोबर 3 लाख 95 हजार 048 वर देशातील कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 13 हजार 831 रुग्णांनी कारोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. देशाचा रिकव्हरी रेट 54.12 टक्के एवढा झाला आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 68 हजार 269 एवढे आहेत. मागील 24 तासात 9,120 रुग्ण बरे झाले आहेत. देशात एकूण बळींची संख्या 12,948 एवढी झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
1:13 PM 20-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here