रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात जि. प. च्या प्राथमिक शिक्षकांची १८०३ पदे रिकामी आहेत. त्यातच जिल्हा बदली मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे शाळांवर शिकवायला कोणी नाही, अशी स्थिती आहे.
सन २०१७ पासून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. ती अद्याप पूर्ण झालेली नाही. नवीन भरतीची घोषणा केली आहे, तिची नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र २०१७ ची भरती प्रक्रिया पूर्ण कधी होणार? याबाबतचा संभ्रम कायम आहे. जुनी भरती अपूर्ण ठेवून नवीन भरतीची घाई सुरू झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:02 13-09-2023
