रत्नागिरी शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात

0

रत्नागिरी : गणेशोत्सव तोंडावर आला असताना रत्नागिरी शहरातील विविध रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे हि मोठी समस्या होती. अनेक नागरिकांनी व मनसे सारख्या राजकीय पक्षांनी यावर विविध माध्यमातून आवाज उठवला होता.

आता हे खड्डे खडी आणि डांबराने बुजवण्याच्या कामास सुरुवात झाल्याचे दिसत आहे. मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी करण्यापेक्षा खडी आणि डांबराचा वापर करून हे खड्डे बुजवावेत अशी नागरिकांची मागणी होती. आता या कामाला सुरुवात झाली असून गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येतील असे नगरपालिकेकडून कळविण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:37 14-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here