रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे व झरेवाडी पासून चांदेराई पंचक्रोशीतील लोकांना या महामार्गांवर येताना जाताना उंच भागामुळे, खड्डे मुळे त्रास होत होता तसेच झरेवाडी शेतीशाळे जवळ बस स्टॉप वर बस थांबत नव्हती व बस साठी उभे राहणे ग्रामस्थांना गैरसोयीचे होत होते. या समस्या ग्रामस्थांच्या वतीने ॲड. अवधूत कळंबटे यांनी दादा दळी यांच्या कानावर घातल्या. दादा दळी यांनी बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्या मार्फत चव्हाण यांच्या कानावर विषय घालून रविवारी सकाळी संबधित ठेकेदार व ग्रामस्थ यांची भेट घडवून आणून ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्याच्या सूचना केल्या.
त्याप्रमाणे रविवारी सकाळी १० वाजता संबधित ठिकाणी ठेकेदार शेतलांनी हे स्वतः हजर राहून त्यांनी खड्डे तात्काळ भरून बंद केलेला एक्सेस सुरु करून व बस स्टॉप वर दोन्ही बाजूला ग्रामस्थांना उभे राहण्याची व्यवस्था करून देतो असे सांगितले.
यावेळी दादा दळी यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांना सांगून राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांची ग्रामस्थांसोबत चर्चा घडवून पाली हून येणारे वा रत्नागिरी हून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व झरेवाडी व चांदेराई पंचक्रोशीच्या लोकांसाठी एक्सेस साठी चर्चा करून सर्वांच्या सोयीचा मार्ग काढू.
यावेळी झरेवाडी येथील ॲड. अवधूत कळंबटे, सुभाष कळंबटे, गिरीश शितप, प्रविण कळंबटे, जयवंत कळंबटे, मोरेश्वर कळंबटे, मंदार कळंबटे, अमोल कळंबटे, कांता देसाई, निलेश सनगरे हे सर्व उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 18-09-2023
