रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी सुरू झाली असून रविवारी रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वरजवळ सोनवी पुलावर दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती.
गणेशोत्सव दोन दिवसांवर आला आहे. त्यात आजची रविवारची सुट्टी साधून अनेक चाकरमानी कोकणाकडे निघाले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गणेशोत्सवासाठी खासगी वाहने तसेच एसटीच्या जादा गाड्यांनी येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे सोनवी पुलावर आज सकाळपासून वाहनांची कोंडी होत आहे. दहा मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा तास ते दोन तास ताटकळत राहावे लागत आहे. दोन वाहतूक पोलीस तसेच गृहरक्षक दलाच्या साह्याने वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अवजड वाहनांना गणेशोत्सवाच्या काळात बंदी आहे. मात्र स्थानिक अवजड वाहने या महामार्गावरून धावत असल्याने त्यांचाही मोठा अडथळा होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:57 18-09-2023
