मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात ३२१४ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १,३९,०१० एवढी झाली आहे. तर १९२५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ६९,६३१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ६२,८३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात मागील २४ तासात २४८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आजवरचा सर्वाधिक आकडा आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ६५३१ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.