रत्नागिरी : लॉकडाऊन मध्ये जागोजागी असणारा बंदोबस्त, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी, शहरातून लागू असणारी संचारबंदी यामुळे चोरट्यांची चांगलीच गोची झाल्याचे पहावयास मिळत आहे. परजिल्ह्यातून आवश्यक पास शिवाय येणे शक्य नसल्याने इतर जिल्ह्यातून चोरीच्या हेतूने येणाऱ्या चोरट्यांना चांगलाच अटकाव झाला आहे. यामुळेच लॉकडाऊन काळात घरफोड्यांचे नगण्य असल्याचे दिसून येत आहे. मात्र लॉक डाऊन उठल्यावर व इतर नियम शिथिल झाल्यावर एकंदर गुन्ह्यांचे प्रमाण वाढेल अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
05:30 PM 24/Jun/2020