देशातल्या सर्व सहकारी बँका आता आरबीआयच्या नियंत्रणाखाली; केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : देशभरातल्या सहकारी बँकांबाबत मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातल्या सर्व सहकारी बँका या आता आरबीआयच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे. आरबीआय ज्या पद्धतीने शेड्युल बँकांच्या कामकाजावर नजर ठेवते, त्याच पद्धतीने आता सहकारी बँकांच्या कामावरही लक्ष ठेवलं जाणार आहे. यामुळे खातेदारकांना त्यांचा पैसा सुरक्षित असल्याचा विश्वास बसेल, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:15 AM 25-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here