नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात पहिल्यांदाच कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८ हजारांच्या पुढे गेली, असे असूनही भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ५८ टक्के झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा ३ टक्के आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण म्हणजेच डबलिंग रेट हा १९ दिवसांवर पोहचला आहे, अशीही माहिती हर्षवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:57 PM 27-Jun-20