मुंबई : राज्यात रोज नव्याने रुग्ण सातत्याने सापडत आहेत. मात्र याबरोबरच राज्यातील रुग्ण मोठ्या संख्येत कोरोना मुक्तही होत आहेत. गुरुवारी राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांची रुग्णसंख्या एक लाख पार गेली असून गुरुवारी एकाच दिवशी ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या रुग्णसंख्येबरोबरच आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १ हजार १७२ इतकी झाली आहे. दरम्यान राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ६३३० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. आता राज्यातील एकूण बाधित रुग्णसंख्या १,८६,६२६ इतकी झाली आहे. तर सध्या राज्यात ७७,२६० रुग्ण हे कोरोनावर उपचार घेत आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:28 PM 03-Jul-20