खेड : तालुक्यातील घेरारसाळगड भराडेवाडी येथील मालू गोरे यांच्या मालकीच्या जनावरांसह शेळ्यांवर झालेल्या हल्ल्यात जनावरे व शेळ्या जखमी झाल्या. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मानवी वस्तीतही बिबट्याचा वावर सुरू असल्याने ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यामुळे वनखात्याने याची गंभीर दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:52 20-11-2023
