रत्नागिरी एसटी विभागाला २३ कोटींचा निधी; पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

0

बसस्थानक होणार ‘हायटेक’

रत्नागिरी : रत्नागिरी एसटी विभागाच्या विविध कामासाठी तब्बल २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून ‘हायटेक’ बसस्थानक बांधकामापासून बसस्थानक डागडुजी व इतर कामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरी दौऱ्यावर असताना पालकमंत्री उदय सामंत यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या रखडलेल्या रत्नागिरी एसटी बसस्थानकाचे काम लवकर सुरू होणार असून, यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. यापैकी रत्नागिरी बसस्थानकासाठी ११ कोटी ११ लाख मंजूर करण्यात आले असून उर्वरित निधी हा जिल्ह्यातील बसस्थानके व त्याच्या संबंधित कामांसाठी खर्च करण्यात येणार असल्याचेही राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी हायटेक बसस्थानकाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे, यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. एस.टी.च्या वरिष्ठ अधिकारी हे काम लवकरात लवकर पूर्णत्वाला जावे, यासाठी पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:42 PM 20/Nov/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here