तीन महिन्यांचे वीज बिल माफ करावे; बिरसा क्रांती दलाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

रत्नागिरी : एप्रिल, मे, जून २०२० या तीन महिन्यांचे वीज बिल माफ करा, अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे कोकण विभागप्रमुख आणि अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. लॉक डाऊन काळातील तीन महिन्यांची बिले भरमसाट आली आहेत. त्यामुळे अनेकजण अडचणीत आले आहेत. त्यामुळे एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांचे बिल माफ करावे, बिलाची आकारणी करताना खर्च झालेल्या विनयचे समान चार भाग करून त्याला घरगुती दर लावावा. बिलासोबत लावलेले अधिभार रद्द करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन बिरसा क्रांती दलामार्फत देण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:57 PM 08-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here