रत्नागिरी : येथील क्षितिज स्पर्धा फाऊंडेशनतर्फे तालुक्यातील कोतवडे येथे वृक्षलागवड करण्यात आली. या संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य आहे. पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने या फाऊंडेशनतर्फे काम केले जाते. ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेतर्फे कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिरासारखेही सामाजिक उपक्रम राबविले. वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रवीण कांबळे, राज्य उपाध्यक्ष नरेश कांबळे, राज्य सचिव राकेश कांबळे. सदस्य मयूरेश कांबळे, संजोग कांबळे आदी उपस्थित होते. क्षितिजस्पर्श फाऊंडेशनच्या या उपक्रमाबद्दल कोतवडे गाव तसेच परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:18 PM 13-Jul-20