मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत झालेल्या या बैठकीत परीक्षा घेऊ नये ही भूमिका कायम ठेवण्यात आली असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ‘परीक्षा घेऊ नये ही भूमिका आपत्ती व्यवस्थपन समिती ने कायम ठेवली. आजची कोविडची परिस्थिती पाहता परीक्षा घेणं शक्य नाही. अनेक महाविद्यालयात क्वारन्टाइन सेंटर करण्यात आले आहेत. मागच्या परिस्थिती पेक्षा आताची कोविड संसर्गाची परिस्थिती गंभीर आहे,’ असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं आहे.
काय म्हणाले उदय सामंत?
– एटीकेटी बाबत सर्व कुलगुरूंनी सकारात्मक निर्णय घेतला
– बंगळुरूमध्ये 50 जणांची पारीक्षा घेतली यात निम्म्या विद्यार्थ्यांना कोविडची बाधा झाली
– मग हजारो विद्यार्थ्यांची जबादारी कोण घेणार
– वाईन शॉप आणि विद्यार्थी यांची तुलना करू नका
– पालक आणि विद्यार्थी या सर्वांनी या परीक्षेला विरोध केला
– सरकारला कुठला इगो नाही
– 12 हजार कंटेन्मेंट झोन, या मध्ये 1 कोटी लोक आहेत, मग येथील विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेणार?
– विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:31 PM 13-Jul-20