मुंबई : राज्यात 1 ते 12 जुलैपर्यंत 865 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 11 लाख 82 हजार 130 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्यात गरीब व गरजूंना एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये आतापर्यंत 11 लाख 82 हजार 130 आणि असे एकूण 1 एप्रिल ते 12 जुलै या कालावधीत 1 कोटी 1 लाख 61 हजार 659 शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:21 PM 13-Jul-20