चिपळूण : चिपळूण शहर आणि परिसरातील नागरिकांच्या समस्या समजावून घेण्यासाठी तसेच नागरिकांना भेटता यावे, यासाठी चिपळूणचे आमदार शेखर निकम दर सोमवारी जनता दरबार भरविणार आहेत. चिपळूण शहरातील त्यांच्या संपर्क कार्यालयात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हा जनता दरबार भरेल. नागरिकांच्या काही समस्या असतील तर त्यांनी त्या ठिकाणी येऊन आमदारांसमोर त्या मांडता येतील. येत्या १ ऑगस्टपासून जनता दरबाराचा हा उपक्रम सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रमुख मिलिंद कापडी यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:15 PM 14-Jul-20