ठाकरे सरकार दोन महिन्यांत कोसळेल; आता ‘या’ नेत्याचा दावा

0

पंढरपूर : राज्यातलं महाविकास आघाडी सरकार अंतर्विरोधातूनच कोसळेल, असा दावा काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला असताना आता माजी कृषीमंत्री व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही सरकारबाबत मोठा दावा केला आहे. खोत म्हणाले, राज्यात करोना सदृष्य लक्षणे असलेल्या व्यक्तींची वेळेत चाचणी केली जात नाही. एकीकडे अशी दयनीय अवस्था असताना विकासालाही पूर्णपणे ब्रेक लागला आहे. मतदारसंघांचा विकासनिधी थांबवण्यात आला आहे. या स्थितीमुळेच सत्ताधारी तिन्ही पक्षांतील आमदारांची नाराजी वाढत चालली असून या नाराजीचा स्फोट होऊन राज्यातील सरकार कोसळणार आहे, असे भाकीत सदाभाऊ खोत यांनी केले आहे. पुढील दोन महिन्यांत मध्य प्रदेश आणि राजस्थानपेक्षाही मोठी फूट महाराष्ट्रात पाहायला मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:00 PM 17-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here