मुंबई : वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत २९८ विमानांद्वारे ४२ हजार ९५८ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यातील मुंबईच्या प्रवाशांची संख्या १४ हजार ६११ आहे. उर्वरित महाराष्ट्रातील १४ हजार ९९२ आणि इतर राज्यातील १३ हजार ३५५ प्रवाशीही या अभियानांतर्गत मुंबईत दाखल झाले आहेत. दिनांक ३१ जुलै २०२० पर्यंत आणखी १०५ विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे. कोरोना विषाणुविरुद्ध शासन निग्रहाने लढत असतांना परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना कॉरंटाईन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:00 PM 18-Jul-20