खेड : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेल्या ५ महिन्यांपासून बंद असलेली खेड-रसाळगड बसफेरी शुक्रवारपासून पूर्ववत झाल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या बसफेरीअभावी रसाळगड येथील ग्रामस्थांना उपचारासाठी शहरात येण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. तब्बल ५ महिने बसफेरी बंद झाल्याने ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे, आनंद खेडेकर यांनी एस.टी. प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. त्यानुसार एस. टी. प्रशासनाने अखेर एस.टी. बस पूर्ववत केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:24 AM 21-Jul-20