रत्नागिरी : कोरोना संकटाच्या काळात २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षातील खासदार निधी न देण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. परंतु त्यामुळे स्थानिक विकासावर मोठा परिणाम होणार आहे, त्यामुळे हा निर्णय रद्द करून खासदारांना खासदारांचा स्थानिक विकास निधी द्यावा, असे पत्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. खासदार निधीतून मतदारसंघातील शिक्षण, पाणी, आरोग्य, स्वच्छता अशा सुविधांबरोबरच भूकंप, सुनामी अशा आपत्तीच्या संकटात सामान्य माणसाला मदत केली जाते. मात्र हा निधी न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्याचा स्थानिक विकासावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा व पूर्ववत खासदार निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती या पत्रातून श्री. विनायक राऊत यांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:04 AM 23-Jul-20