छावा प्रतिष्ठान करणार कवी केशवसुत स्मारकाची स्वच्छता

0

रत्नागिरी : रत्नागिरी येथील छावा प्रतिष्ठानतर्फे मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकाची आणि परिसराची स्वच्छता येत्या २ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रच दक्षता घेण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील छावा प्रतिष्ठानतर्फे करोना महामारीच्या काळातही वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून छावा प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. येत्या २ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता स्वच्छतेच्या उपक्रमाला सुरुवात होईल. या अभियानांतर्गत खड्डे भरणे, वादळाच्या काळात पडलेली झाडे तोडणे, गवत काढणे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणे आदी कामांचा समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:04 PM 30-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here