रत्नागिरी : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 8 हजार 99 शेतकऱ्यांच्या खात्यावर 22 कोटी 74 लाख 82 हजार रक्कम जमा करण्यात आली आहे. एकूण 11 हजार 838 खातेदारांपैकी 8 हजार 99 खातेदारांची कर्जमुक्ती झाली असली तरीहि उर्वरीत खातेदारांची खाती प्रमाणित झाल्यानंतरच त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पदभार घेतल्यानंतर काही दिवसांमध्येच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी योजना जाहीर केली. त्यामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. पहिल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात 18 हजार 628 शेतकरी निकषानुसार पात्र ठरलेले होते. राज्य सरकारने कर्जमुक्ती योजना जाहिर केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील 11 हजार 838 खातेदारांनी बँकांकडे नोंदणी केली होती. त्यानंतर कर्ज खात्यांची छाननी करुन बँकांनी 9 हजार 511 कर्जखात्यांचे आधार प्रमाणिकरण करुन गावनिहाय याद्या प्रसिध्द केल्या होत्या. त्यापैकी 8 हजार 643 खाती प्रमाणित करण्यात आली. तर 868 खाती शिल्लक राहिली होती. प्रमाणित केलेल्या कर्जखात्यांपैकी 8 हजार 99 कर्जखात्यांवर 22 कोटी 74 लाख 82 हजार रक्कम वर्ग करुन शेतकर्यांना कर्जमुक्त करण्यात आले आहे. कर्जमुक्ती झालेल्या शेतकर्यामध्ये मंडणगड 404 खातेदारांना 2 कोटी 13 लाख 60 हजार 264 रुपये, दापोली 492 शेतकर्याना 60 लाख 39 हजार 897 रु., खेड 852 खातेदारांना 2 कोटी 11 लाख 69 हजार 675 रु., चिपळूणमधील 1 हजार 277 खातेदारांना 1 कोटी 79 लाख 28 हजार 842 रु., गुहागरमधील 646 खातेदारांना 1 कोटी 3 लाख 44 हजार 420 रु., संगमेश्वरमधील 1 हजार 1 खातेदारांना 2 कोटी 40 लाख 38 हजार 987 रु., रत्नागिरीमधील 1 हजार 35 खातेदारांना 2 कोटी 82 लाख 86 हजार 558 रु., लांजामधील 1 हजार 238 खातेदारांना 4 कोटी 28 लाख 77 हजार 128 रु., राजापूरमधील 1 हजार 244 खातेदारांना 5 कोटी 54 लाख 44 हजार 230 रु.ची कर्जमाफी करण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:40 AM 31-Jul-20