चिपळुणात यंदा नारळी पौर्णिमेची मिरवणूक रद्द

0

चिपळूण : श्री ग्रामदेव जुना कालभैरवच्या वतीने दि. ३ ऑगस्टपर्यंत नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मात्र, या काळात भाविकांना दर्शन बंद राहणार आहे. दि. १ ऑगस्ट रोजी ग्रामदेवतेची पूजा, अभिषेक व पोवते अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल. दि. २ रोजी गांधारेश्वर येथे जागर कार्यक्रम होईल. दि.३ रोजी पवित्रक अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल. यावर्षी नारळी पौर्णिमेची मिरवणूक कोरोना असल्याने होणार नाही. फक्त नदीत श्रीफळ अर्पण करून नारळी पौर्णिमा उत्सव साजरा होईल. यावेळी शासकीय नियमांचे पालन होणार असून पाच मानकऱ्यांच्या उपस्थितीत विधी पूर्ण होतील. यावर्षी शहरामध्ये घरोघरी पोवत्याचे वितरण करण्यात येणार नाही. ज्यांना ते पाहिजे असेल त्यांनी मंदिराच्या बाहेर येऊन नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यानंतर भक्तांनी दखल घ्यावी, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:36 AM 01-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here